
विजयकुमार गायकवाड
तालुका प्रतिनिधी करमाळा
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 21 जागेसाठी तब्बल 272 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. वास्तविक आदिनाथ साखर कारखान्यावर कर्जाचा डोंगर असल्यामुळे हा कारखाना कित्येक वर्ष बंद अवस्थेत आहे. या कारखान्यावरील कार्यस्थळाची पाहणी केली असता या कारखान्याची दुरावस्था पहावयास मिळाली. अशा परिस्थितीत या कारखान्यावर संचालक होण्यासाठी 21 उमेदवार मिळतील का नाही अशा प्रकारची परिस्थिती असताना प्रत्यक्षात मात्र विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत खरे तर कारखान्याची आर्थिक परिस्थिती विचारात घेता व सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून ही निवडणूक बिनविरोध करून सक्षम कंपनीला चालवणे देणे गरजेचे असताना या बंद कारखान्याचा संचालक होण्याचा छंद अनेकांना लागल्याने या बंद कारखान्याच्या आत काय खजिना लपलाय की , लग्नपत्रिकेत कारखान्याचा संचालक पद छापण्याचा मोह का कार्यक्रमात सत्काराची हौस याविषयी चर्चा रंगू लागली आहे.
